ND NEWS
दिंद्रुड तालुका माजलगाव या अठरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावाला चाटगाव तालुका धारूर येथील तळ्यातून पाणीपुरवठा असून येथील शेतकऱ्यांनी अवैधरित्या पाण्यात विद्युत मोटारी टाकून पाणी उपसा चालू आहे त्या अनुषंगाने एक महिना अगोदर धारूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते, एक महिना उलटून गेला तरी त्याची आजपर्यंत दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामपंचायत ने जिल्हाधिकारी बीड यांना जलसमाधी आंदोलनाचा इशारा देत निवेदन दिले होते. नुसार आज दि. २८ रोजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी चाटगाव तलावात जलसमाधी आंदोलन करत आहेत.
ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी यांना बीपी, शुगर सारख्या आजाराने जखडले आहे तर काही जणांना होता येत नाही काही विपरीत घटना घडल्यास यासाठी प्रशासन जबाबदार असेल
– अजय कोमटवार, सरपंच ग्रामपंचायत दिंद्रुड.