मुंडे भगिनीच्या कामाचे श्रेय घेन्यापेक्षा परळी शहरातील बोगस कामाचे व बंदपाडलेल्या सुतगिरनीचे व अवेध वाळु ऊपशाचे श्रेय घ्या. ..उतमराव माने
प्रतिनिधी:- दिपक गित्ते (परळी)
दि.२- भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजा ताई मुंडे व जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रितम ताई मुंडे यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे परळी-गंगाखेड रस्त्यासाठी २२४ कोटींचा निधी बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी ५६ कोटींचा निधी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत जिल्ह्यातील सात रस्त्यांसाठी ७५ कोटींचा निधी मंजूर करुन आणले पण याचे फुकटचे श्रेय पालकमंत्री घेऊ पाहत आहेत.मुंडे भगिनीच्या कामाचे श्रेय घेन्यापेक्षा परळी शहरातील बोगस कामाचे व बंदपाडलेल्या सुतगिरनीचे व अवेध वाळु ऊपशाचे श्रेय घ्या अशी टीका भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य उत्तम राव माने यांनी केली आहे.
परळी तालुक्यातील चाललेली बोगस कामे, तरुनाच्या हाताला काम मीळवून देनारी सुतगिरनी बंद पाडली.
दिवसा ढवळ्या होत आसलेला गोदावरी पात्रातील बेकायदेशीर वाळु उपसा परळी शहरातील वाढ ती गुंडगिरी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भ्रष्टाचार करनारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आसुन अशाप्रकरनाला कोनी विरोध करत असेल तर त्याच्यावर खोटे आरोपकरुन बंदोबस्त करन्यात माहेर आहे.परळीतालुक्यातील तरूनाच्या हाताला काम मीळत नसल्यामुळे त्याच्यावर पूणे. मुबई येथे .कामावरजानेची वेळ सतत येत आहे याचे श्रेय घ्यावे. नगरपालिका येथिल कामकरनारे सफाई कामगार या़च्या कष्टाच्या पैशावर हातसाफ करून घेनारी राष्ट्रवादी नगरसेवक आहेत यामुळे सर्व अधिकारी वर्ग आज दहशतीखाली काम करत आहेत. अशा गोष्टीला खतपाणी घालनाराने कामाचे श्रेय घेन्याचा प्रयत्न करु नये. अशी घणाघाती टीका भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तम दादा माने यांनी केली आहे.