ND NEWS | बीड /प्रतिनिधी
मानवतेला काळीमा फासणाऱ्या बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील ११आरोपींची नुकतीच सुटका झाल्यानंतर त्यांचे पेढे वाटून आनंद साजरा करणारी, त्यांचा सत्कार करणारी व हे आरोपी सुसंस्कृत आहेत असे म्हणणाऱ्या व्यभिचारी प्रवृत्ती या मानव जातीला कलंक आहेत. या प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत असे प्रतिपादन रा. कॉ. महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष संगिता तुपसागर यांनी केले.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने दि .२९ ऑगस्ट रोजी निदर्शने करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. सदरील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या त्यांचा सत्कार करणाऱ्या विशिष्ट विचारधारेतील असून त्यातील काही तर भाजपा पक्षाशी संबंधित आहेत असेहीत्या म्हणाल्या.