ND NEWS INDIA
बीड श्रीहरी कांबळे
गेली आठवडा भरात बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण होते. त्यात काल रात्री व आज दि 9 रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान जिल्ह्याच्या काही भागात जबरदस्त अवकाळी पाऊस तर काही भागात गारपीट झाली. यात शेतकर्यांचे खूप नुकसान झाले. उन्हाळी पिके , फळबागा, भाजीपाला पिके आदींचे अतोनात नुकसान झाले. अचानक झालेल्या अवकाळी पावसाने सिरसाळा व परिसरात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्या सा अवकाळी पावसाने सिरसाळा व परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील आंब्याचे तसेच विट भट्टी चालकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
छायाचित्र 1 मध्ये शेतातील काढणी झालेल्या पिकांच्या गंजी वाहून आलेल्या .
छायाचित्र 2 मध्ये आंबा या फळाबागेचे झालेले नुकसान
छायाचित्र 3 भाजीपाला या पिकांतर्गत मिरची या पिकाचे झालेले नुकसान
धारूर तालुक्यात तसेच माजलगाव तालुक्याचा काहिभाग तर परळी अंबाजोगाईचा अल्पसा भाग अवकाळी पावसामुळे व गारपिटीने क्षतीग्रस्त आहे , शासनाने सदर भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत तर दुसरी कडे राख व मातीचे भाव तसेच मजुरांचे प्रश्न यांनी त्रस्त असलेला वीटभट्टी व्यावसायिक या या गारपिटीचा बळी ठरला आहे. लाखो रुपयांचे नुकसान कसे पचावयाचे या विवंचनेत आहे.