अजित पवारच पक्षप्रमुख आहेत आणि राहतील
मुंबई वृतसंस्था :
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचे ठरले. त्यावेळी वेगवेगळे कायदेतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत. कायदेतज्ज्ञांनी जे सांगितले, त्या मार्गाने केले तर कुठेही अपात्रतेची कार्यवाही होणार नाही. दोन ते चार कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे
निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. सरकारमध्ये सामील होण्याआधी कागदपत्रे व सह्या केल्या आहेत. आम्ही पक्ष आणि चिन्हावर दावा दाखल केला आहे. अजित पवार हे पक्षाचे प्रमुख आहेत व राहतील,
पक्षाची घटना प्रचलित राजकीय पक्षाचे नियम याची चर्चा करून मांडणी आधीच केलेली आहे, असेही छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.
शरद पवार यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत आम्ही चर्चा केली. सुप्रिया सुळेही तिथे होत्या. सुरुवातीला जयंत पाटील व सुप्रिया सुळे यांच्या सोबत देखील चर्चा केली होती. शरद पवारांसोबत महिनाभरापासून चर्चा सुरु होती. परंतु, त्यांनी ऐकलंच नाही. दोन ते चार लोकांना घेऊनच पक्ष चालवू लागले तर लोक वाट शोधतात तेच राष्ट्रवादी पक्षातच झालं आहे, असेही ते म्हणाले.