छञपती संभाजी नगर व धाराशिव जिल्हा नामकरण केल्याबद्दल सकल हिंदु समाजाच्या वतिने राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन.
ND NEWS | केज : हनुमंत गव्हाणे
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर व धाराशिव हे नाव केल्याबद्दल सरकारला व प्रशासनाला अभिनंदनपर पत्र देऊन सकल हिंदु समाजाच्या वतीने अभिनंदन केल्याचे निवेदन तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्याकडे देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात असणारा छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मातीत औरंगजेब व असंख्य मुघल सम्राट यांची माती याच महाराष्ट्रात झाली आहे. यांच्या नावाने असलेल्या शहरांची नावे बदलून छत्रपती संभाजी नगर व धाराशिव नाव केल्याबदल अभिनंदनाचे पत्र देताना किसन दादा कदम,हनुमंत साने सर,विश्वास राऊत, संदीप राऊत,संजय लोंढे, अजय राऊत, महादेव मोरे,विशाल नाईकवाडे, वल्लभ राऊत, दतू जगताप,गणेश सत्वधर, सोनल देवकर,सोनू नाईकवाडे,काकाणी, बळीराम चाटे आदी उपस्थित होते.यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकार आणी प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.