‘अजित पवार ,गौतमी पाटील कशी नाचते यापेक्षा नीरा नदी कशी वाचेल याकडे लक्ष द्या’
◼️ND NEWS | बारामती
बारामती व फलटण तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नीरा नदीत माळेगाव कारखान्यातील रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्यात आल्याने प्रदूषणाने कळस गाठला आहे.
यामुळे नदी काठच्या नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या गोष्टीकडे लक्ष द्यायला अजित पवारांना वेळ नसून,अजित पवार गौतमी पाटील कशी नाचते यापेक्षा नीरा नदी कशी वाचेल याकडे आपण लक्ष द्यावे.अशा प्रकारचा नीरा नदी काठील शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी मिथुन आटोळे यांनी केलाय. अजित पवारांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार सभेवेळी नीरा नदीकाठील लोकांना शब्द दिला होता.मात्र अजित पवारांना त्यांचा शब्दाचा विसर पडला की काय ? असा सवाल देखील आटोळे यांनी उपस्थित केला आहे.