• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अनेक वर्षापासून परळीमध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या तात्काळ बदल्या करा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडची मागणी

ByDeepak Gitte

Mar 2, 2023

 

परळी (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षापासून परळी मध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे. मागच्या 15/20 वर्षापासून परळी मध्ये वेगवेगळ्या कार्यालयात अनेक अधिकारी/कर्मचारी ठाण मांडून बसलेले आहेत येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पारदर्शक पार पाडण्याच्या करिता परळी येथे निवडणुकीच्या संबंधित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यालयामधील मागच्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना तात्काळ येथुन हलवून त्यांच्या ठिकाणी नवीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे यामध्ये नगरपरिषद ,तहसील कार्यालय, पंचायत समिती ,पोलीस स्टेशन यासह इतर विविध कार्यालयामध्ये मागच्या 15/20 वर्षापासून अनेक अधिकारी कर्मचारी परळीतच आहेत. त्यांना जर इतरत्र हलावल नाही तर निवडणुका पारदर्शक होणार नाहीत. या गोष्टीवर संभाजी ब्रिगेड ठाम असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका संविधानिक मार्गाने होण्याकरता विशिष्ट पक्ष व नेत्यांच्या मर्जीनुसार हे अधिकारी कर्मचारी काम करणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी ही प्रक्रिया होणे अनिवार्य आहे. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या अधिकाऱ्यांना निवडणुकीपूर्व तात्काळ हलवण्यात यावे अशी उपविभागीय अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवादानाद्वारे मागणी केली आहे. असे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी म्हटले आहे .