सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयाला प्राजक्ता माळीचा पाठिंबा
काय आहे प्राजक्ताची पोस्ट?
ND NEWS I:
भारताचा स्वातंत्र्यदिन(75th Independence Day) हा प्रत्येक भारतीयासाठी एक उत्साहाचा सण असतो. यावर्षी तर हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास कारण यंदा आपण आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहोत.
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव.. स्वातंत्र्यदिन चिरायू होवो. माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता , परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो. या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं! या कामी सर्व देशवासीयांनी झटावं! आणि हो, आजपासून फोनवर हॅलो बंद, #वंदेमातरम् सुरू. “देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती” ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना,’ अशी पोस्ट तिने लिहिली असून त्यासोबत अटल बिहारी वाजपेयी यांची एक कवितासुद्धा तिने पोस्ट केली आहे.