केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे
केज तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु दिनांक २० ते २६ तारीख दरम्यान झालेल्या आतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सर्व नद्यांना प्रचंड प्रमाणात पुर आल्यामुळे नदीकाठच्या शेती वाहुन गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी तोंडाशी अलेले पीक वाया गेले आहे तरी शासनाने शेतकऱ्यांना आधार देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 हजार रुपये तात्काळ द्यावी तसेच 100 टक्के पिकविमा लागु करून त्याचे लवकरात लवकर वाटप करून, जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्या आधार द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कोषाध्यक्ष रामराजे गलांडे यांनी केली आहे.