सुशील टकले : तालुका प्रतिनिधी
ND NEWS:- मंत्रालयातील पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर औरंगाबाद परिक्षेत्रातील प्रलंबित बदल्यांना बुधवारी मुहूर्त लागला. गेवराई तालुक्यातील तीन पोलिस उपनिरीक्षकांच्या बदलल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी काढले आहेत.
गेवराई तालुक्या अंतर्गत तीन पोलीस ठाणे असून यातील गेवराई शहरात असलेल्या गेवराई पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड यांची औरंगाबाद ग्रामीण या ठिकाणी बदली झाली असून याच बरोबर पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांची बदली जालना जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे. चकलंबा पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे यांची औरंगाबाद ग्रामीण या ठिकाणी बदली करण्यात आलेले आहे.