मी असं काय बोललो..? अजित पवार यांचा थेट भाजपलाच सवाल…
महाराष्ट्र :
भगतसिंह कोश्यारी यांनी आमच्या महापुरुषांबद्दल आणि आमच्या दैवतांबद्दल बोलतात. मात्र तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहात तरीही तुम्ही बेताल वक्तव्य कशी काय करु शकता.
हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. त्यावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत विरधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज,सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बेताल वक्तव्य केली होती.
संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते.
त्यामध्ये सर्वार्थाने मी ते बोललो होतो मात्र त्यामध्ये चूक काय होते असा सवाल करत त्यांनी भाजपलाच सवाल केला आहे. त्यामुळे भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर नेत्यांवर अजित पवार पुन्हा एकदा बरसले आहेत.
भगतसिंह कोश्यारी यांनी आमच्या महापुरुषांबद्दल आणि आमच्या दैवतांबद्दल बोलतात. मात्र तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहात तरीही तुम्ही बेताल वक्तव्य कशी काय करु शकता असा थेट सवाल अजित पवार यांनी राज्यपालांसह भाजप नेत्यांना केला आहे.