ती मिटकरी नटूनथटून टिव्हीपुढं बसतंय,
ND NEWS I: राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत.
शिवसेनेचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. त्यातून शिंदे गटावर विरोधक सातत्याने टिका करत आहेत.
शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हा डायलॉग तुफान गाजला. त्यामुळे, मुंबईत परत येताच ते महाराष्ट्रभर फेमस झाले. त्यामुळे, त्यांचे विधान सध्या ब्रेकींग न्यूज होत आहे. त्यांनी कोणावरही टिका केली, किंवा टिकेला उत्तर दिले, त्याचीही चर्चा होत आहे.
गणेशोत्सवानिमित्त आज माध्यमांशी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी “मातोश्रीच्या अंगणात सुख भरभरून द्यावं, रश्मी वहिनी आनंदी राहाव्यात” अशी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे. तसेच, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार प्रहारही केला.
संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे मिटकरीला वाटतंय, त्यांची जागा आपल्याला मिळेल म्हणून नटूनथटून तेल लावून टिव्हीपुढे येतंय” असा टोलाही लगावला आहे.