केज प्रतिनिधी: हनुमंत गव्हाणे
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केट (माॅल मध्ये) वाईन विक्रिची परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचा केविलवाणी प्रकार राज्य सरकार करत आहे, सरकारला मोठ्या प्रमाणात करवसुली वाढवायची असेल तर लोकांच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन करु नका दुसरे मार्ग सरकारने आवलबावेत
असा सवाल शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड केला आहे.
किती दुर्दैव आहे एकीकडे व्यसन मुक्तीवर लाखो रुपये खर्च करायचे दुसरी कडे वाईन सुपर मार्केट मध्ये राशन दुकानात देण्याची घोषना करायची पिड्या ची पिढ्या व्यसनाने बरबाद झाल्याच भान राज्यकर्त्यानी ठेवावे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर शेतकऱ्यांना वीज फुकट द्या शेतीमालाला हमीभाव द्या नोकरदारांना जी फॅसिलिटी देतात त्याच शेतकऱ्यांना देऊन दाखवा म्हणजे शेतकर्याच्या हीतसाठी काम करता ही जागला कळेल मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा तात्काळ मागे घ्या आन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.