गेवराई शहरप्रतिनिधी गणेश ढाकणे
विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र व राज्यसरकार कडून प्रचंड निधी मिळाला.आण्णांच्या भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धतीमुळे मिळालेल्या निधीचा परिपूर्ण उपगोग विकासकामांसाठी झाला आणि मतदारसंघातील लोकांच्या अडचणी कमी होऊ* *लागल्या.लोकप्रतिनिधी प्रामाणिक असेल आणि त्याचा काम करण्याचा हेतू शुद्ध असेल तर तो मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतो हे आण्णांच्या कार्यपद्धती मुळे लोकांना दिसून लागले.म्हणूनच 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार मायबाप जनतेने तितक्याच प्रामाणिक पणे पुन्हा एकदा आण्णांना निवडून दिले.*
*लोकांचा आण्णांवर असलेला दृढ विश्वास पाहून मतदारसंघातील प्रत्येक जण म्हणतो…*
*आण्णा असे लोकप्रतिनिधी आहेत,जे कधीच उतणार नाहीत,मातणार नाहीत,घेतला वसा टाकणार नाहीत.*
*एक वेळ राजकारण सोडतील पण प्रमानिपणा कधीच सोडणार नाहीत*